Friday, May 20, 2011

देशाला हवा आहे योग्य गुरु ...............

आपल्या देशात सध्या भ्रष्टाचारविरोधी जो तो आंदोलन करीत आहे ..... ही चांगली गोष्ठ आहे पण जी लोक आंदोलने करीत आहेत ती किंवा त्यांना पाठींबा देणारी मंडळी कशी आहे हे जनतेला माहीतच आहे ........खरे तर आपल्या देशात आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा धार्मिक आणि कार्मिक भ्रष्टाचारच मोठा जीवघेणा आहे .......साधं उदाहरणच घ्यायचे झाले तर सत्यसाईबाबा यांना तीरांग्यामध्ये गुंडाळून अखेरची सलामी देण्यात आली याचाच अर्थ बाबा देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या तोडीचे ठरले .....हाही भ्रष्टाचारच आहे पण त्याविरुद्ध एकही गुरु बोलत नाही . . . .नीरा राडिया या तर मोठमोठ्या कंपन्यांसाठी आणि मंत्र्यांसाठी संयोग गुरु ठरल्या पण या कंपन्यांविरुद्ध कोणी बाबा, अण्णा बोलत नाही ..........वेदिशी बंकेंत असलेला पैसा समोर केला जात आहे आणि या देशात ठिकठिकाणी बाबा बुवांच्या माध्यमातून , जमिनीमधून गुंतवलेला पैसा झाकून तर ठेवला जात नाही ना ? असे म्हणतात भारत हा गरीब लोकांचा आणि श्रीमंत देवांचा देश आहे . देवस्थानांचे बजेट पाहता ते पटते . . . लोकांनी मनोभावे अर्पण केलेल्या पेक्षा लोकांना मनसोक्त लुटून गोळा केलेला पैसा तर या ठिकाणी दडवून ठेवला जात नाही ना हे कोणी पाहावं ? ......याबाबत हे गुरु का बोलत नाहीत .........सिंधू नदी भारतात पुन्हा आणायची स्वप्नं पाहणे वाईट नाही पण आपल्या नद्या पहिल्या टिकवणे शहाणपणाचे नाही का ? ..........

Saturday, May 7, 2011

गरज सरो वैद्य मरो

गरज सरो वैद्य मरो
जलस्वराज्य प्रकल्पातील तज्ञांच्या बाबतीत सरकारने घेतलेली भूमिका अशीच आहे . आता हा तज्ञ दारोदारी फिरेल आणि आपली कहाणी सांगेल तरी सर्वांना विनंती आहे की किमान त्याचे ऐकून घ्या हो . कारण तुम्ही अनेक युवकांना वाचवू शकता . त्यांना हा सल्ला देवू शकता की सरकारची कंत्राटी नोकरी नको रे बाबा ...........